![]() |
| देशातील सर्वात मोठा रेल्वे अपघात. |
ओडिशातील बालासोर येथे भीषण रेल्वे अपघात झाला. यात 200 हून
अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. परंतु देशातील सर्वात मोठा रेल्वे अपघात 1981 मध्ये
झाला होता. बिहारमधील मानसी-सहरसा रेल्वे मार्गावर हा रेल्वे अपघात झाला होता.
बदला आणि धामारा घाट स्थानकादरम्यान मालगाडीचे 9 डबे बागमती नदीत पडले, ज्यात
सुमारे 800 लोकांचा मृत्यू झाला होता.

