ट्रॅकच्या इंटरलॉकिंग सिस्टीममध्ये छेडछाड..
![]() |
ट्रॅकच्या इंटरलॉकिंग सिस्टीममध्ये छेडछाड.. |
ओडिशातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघातात 278 लोकांचा
मृत्यू झाला आहे. तर 1100 पेक्षा अधिक प्रवासी हे जखमी आहेत. या अपघाताबाबत सर्वात
मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. ट्रॅकच्या इंटरलॉकिंग सिस्टीममध्ये जाणीवपूर्वक
छेडछाड केल्याचे पुरावे रेल्वेला प्राथमिक तपासात मिळाले आहेत. त्यामुळे आता या
अपघाताची सीबीआयमार्फत चौकशी करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.

